महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
१ मे१९६० रोजी राज्य निर्मितीच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग चार होते. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर हे विभाग होते परंतु कालांतराने या विभागांमधल्या जिल्ह्यांचे विभाजन होऊन नवीन जिल्ह्यांची तसेच तालुक्यांची निर्मिती झाली त्यामुळे प्रशासकीय कामकाज सोयीचं होण्यासाठी जुन्या विभागांमद्ये बदल करून आणखी नवीन दोन विभाग तयार करण्यात आले. सध्य स्थितीला महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग सहा आहेत. ते खालील प्रमाणे
१. कोकण विभाग - सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड,पालघर,ठाणे, मुंबई उपनगर, आणि मुंबई
२. नागपूर विभाग - नागपूर,वर्धा, चंद्रपूर,भंडारा, गोंदिया,गडचिरोली
३. नाशिक विभाग - नाशिक, अहमदनगर,धुळे, जळगाव,नंदुरबार
४. औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, जालना, परभणी,बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद , हिंगोली
५. अमरावती विभाग - अमरावती,अकोला,बुलढाणा,यवतमाळ,वाशिम
६. पुणे विभाग - पुणे, सातारा, सांगली, सोलापूर,कोल्हापूर
0 टिप्पण्या