बदामी (वातापी) चालुक्य राजवंश
परिचय
चालुक्य राजवंशाच्या तीन प्रमुख शाखा:
- बदामी/वातापी चालुक्य (मूळ शाखा)
- वेंगीचे चालुक्य (पूर्व शाखा)
- कल्याणीचे चालुक्य (पश्चिम शाखा)
बदामी चालुक्यांनी 543 ते 757 इ.स. पर्यंत राज्य केले. या राजवंशाची स्थापना पुलकेशी पहिला याने केली.
महाकुट शिलालेखानुसार, याआधी आणखी दोन शासकांची नावे आढळतात. जयसिंग आणि रणराग परंतु ते स्वतंत्र शासक नव्हते तर कदंब शासकांच्या अधीन सामंत होते. चालुक्यांची मूळ शाखा वातापी/बदामी (विजापूर, कर्नाटक) येथे उगम पावली.
चालुक्य राजवंशावर उत्तरेला हर्षवर्धन आणि दक्षिणेला पल्लव राजवंशाचे राज्य होते. चालुक्य राजवंशाने दोन्ही राज्यांविरुद्ध लढाई केली आणि आपली सत्ता स्थापन केली.
बदामी चालुक्य शासक आणि त्यांचे योगदान
1. पुलकेशी पहिला (543-566 इ.स.)
- बदामी चालुक्य राजवंशाचे संस्थापक
- पदव्या: "स्तायश्रय", "रणविक्रम", "श्रीपृथ्वीबल्लभ"
- यज्ञे: अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ
- उत्तराधिकारी: कीर्तिवर्मन पहिला
2. कीर्तिवर्मन पहिला (566 -597 इ.स.)
- पदव्या: "पुरु-रणपराक्रम", "सत्याश्रय"
- विजय: बनवासीचे कदंब, कोकणचे मौर्य, बेल्लारी-कर्नूल प्रदेशातील नलवंशी राज्ये
- यज्ञ: बहु-सुवर्ण अग्निष्टोम यज्ञ
- वास्तुकला: बदामीतील गुहा मंदिरांचे बांधकाम सुरू
3. मंगलेश (597 - 610 इ.स.)
- विजय: कलचुरी शासक बुद्धराज आणि कोकणचे मौर्य(रेवती बेट)
- धर्म: वैष्णव (पदवी:"परमभागवत")
- वास्तुकला: बदामीच्या गुहा मंदिरांचे बांधकाम पूर्ण
पुलकेशी दुसरा (610-642 इ.स.) - सर्वात महत्त्वाचे शासक
- पदव्या : “सत्यश्रय श्री पृथ्वीबल्लभ महाराज”, “दक्षिणापतेश्वर”, “परमभट्टारक” आणि “महाराजाधिराजा”
- वेंगीची पूर्व चालुक्य शाखा स्थापन(भाऊ विष्णुवर्धन)
- ऐहोळ शिलालेख - कवी रविकीर्ती
- हर्षवर्धनाचा पराभव (नर्मदा नदीच्या काठावर)
- पल्लव राजवंशाची राजधानी कांचीवर हल्ला(शासक महेंद्रवर्मनचा पराभव)
- चिनी प्रवासी ह्युएन त्सांगची भेट
5. विक्रमादित्य पहिला (655-680 इ.स.)
- सत्तासंघर्ष: 13 वर्षे राज्यात अराजकता.
- प्रशासन: भाऊ जयसिंग याला लाटचा राज्यपाल नियुक्त केला.
6. विनयादित्य (680-696 इ.स.)
- युद्धे: पल्लव, पांड्य आणि चोलांशी लढले.
- मृत्यू: विंध्याचल उत्तरेकडील मोहिमेदरम्यान झालेल्या युद्धात.
7. विजयादित्य (696-733 इ.स.)
- पल्लव पराभव: परमेश्वरवर्मन दुसरा याला हरवून कर वसूल केला.
- वास्तुकला: पट्टडकल येथे शिवमंदिर बांधले.
8. विक्रमादित्य दुसरा (733-746 इ.स.)
- पल्लवांवर विजय: नंदीवर्मनाचा पराभव करून "कांचिकोंडा" पदवी धारण केली.
- राष्ट्रकुट उदय: लाटच्या चालुक्य शाखेचा अंत.
9. कीर्तिवर्मन दुसरा (746-757 इ.स.)
- राष्ट्रकूट सरदार दंतिदुर्ग याने पराभव
- चालुक्य साम्राज्याचा अंत
- राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना
निष्कर्ष
बदामी चालुक्यांनी दक्षिण भारतातील राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या काळात वास्तुकला, युद्धकला आणि प्रशासन उत्कृष्ट होते. पण अखेरीस राष्ट्रकूट उदयामुळे या राजवंशाचा अंत झाला.
स्रोत: ऐहोळ शिलालेख, महाकुट स्तंभ शिलालेख, ह्युएन त्सांगची नोंदी
0 टिप्पण्या