📜 चेर राजवंश
चेर राजवंश हा दक्षिण भारतातील एक प्रमुख प्राचीन राजवंश होता, जो तमिळकमच्या तीन प्रमुख राजवंशांपैकी एक होता (चेर, चोल आणि पांड्य). त्यांनी सध्याच्या केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागांवर राज्य केले. चेर राजवंशाचा इतिहास संगम साहित्य, शिलालेख आणि परदेशी स्त्रोतांमधून मिळतो.
🔹 चेर राजवंशाची स्थापना
- “चेर” हा शब्द तमिळ शब्द “चेरल” पासून आला आहे, ज्याचा अर्थ “डोंगराचा उतार”.
- अशोकाच्या शिलालेखांमध्ये “चेर” यांचा “केरळपुत्र” म्हणून उल्लेख केला आहे.
- उदियन चेरल (उदयिन चेरल) हा या राजवंशाचा पहिला शासक व संस्थापक मानला जातो.
- राज्याची राजधानी ‘वंजी’ होती, जी “केरळ देश” म्हणूनही ओळखली जात होती.
🔹 प्रमुख वैशिष्ट्ये व योगदान
- चेर राजवंशाला बरावर, विलावर, कुट्टुवर, पौरयार, मलैयर अशा नावांनीही ओळखले जात असे.
- उदियन चेरल याचा उल्लेख ‘वाणवर्मबन’ व ‘पेरुंजोरन उदियन’ म्हणून करण्यात आला आहे.
- तो दयाळू शासक होता जो मोफत जेवण पुरवणारे स्वयंपाकघर चालवत असे.
- त्यांनी ‘पट्टिनी’ किंवा ‘कन्नगी’ उपासना सुरू केली.
- त्याचा मुलगा नेदुम चेरालथन १५५ साली राजा झाला.
🔹 चेरांची युद्धे व सांस्कृतिक कामगिरी
- चेर आणि चोल शासकांमध्ये अनेक युद्धे झाली.
- पेरुनचेरल इम्पोरई हा विद्वानांचा आश्रयदाता होता आणि अनेक यज्ञ करीत असे.
- त्याच्या काळात दक्षिणेत उसाची लागवड सुरू झाली.
- ‘शेनगुट्टवन’ (लाल चेरा) हा प्रसिद्ध चेर शासक मानला जातो.
🔹 व्यापार आणि परराष्ट्र संबंध
- चेर शासकांचे रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध होते.
- मुशिरी/मुझिरिस हे प्रमुख इंडो-रोमन व्यापार केंद्र होते.
- रोमन शासकांनी व्यापाराच्या संरक्षणासाठी येथे दोन रेजिमेंट स्थापन केल्या होत्या.
0 टिप्पण्या