चोल साम्राज्याचे महान शासक
1. विजयालय (848-871 इ.स)
संस्थापक शासक
- पल्लव शासकांचे सामंत होते.
- तंजावर (तंजौर) जिंकून नवीन राजधानी बनवली.
- "नरकेशरी" ही पदवी धारण केली.
- चोलेश्वर मंदिर बांधले.
2. आदित्य पहिला (871-907 इ.स)
- पल्लव शासक अपराजिता वर्मनचा पराभव करून स्वतंत्र चोल साम्राज्य स्थापन केले.
- "कोदंडराम" ही पदवी धारण केली.
3. परांतक पहिला (907-950 इ.स)
- पांड्य शासक राजसिंह दुसरा याचा पराभव करून "मदुरैकोंडा" ही पदवी मिळवली.
- वेल्लोरच्या युद्धात पांड्य आणि श्रीलंकेच्या सैन्याचा पराभव.
- चोल साम्राज्याच्या सीमा कन्याकुमारीपर्यंत वाढवल्या
- चिदंबरम मंदिर बांधले.
- राष्ट्रकूटांशी तक्कोलमच्या युद्धात पराभव.
4. राजराजा पहिला (985-1014 इ.स.)
सर्वात शक्तिशाली शासक
- कंडलूर येथे चेरांचा पराभव "काण्डलूर शालैकलमरूत" पदवी.
- राजा महेंद्र पंचम याचा पराभव करून श्रीलंकेचा उत्तरी भाग जिंकला .
- त्यांनी श्रीलंकेची राजधानी अनुराधापुरा येथून पोलोनारुवा येथे हलवली त्याचे नाव जयनाथमंगलम ठेवले .
- "शिवपादशेखर" ही पदवी धारण.
- वृहदेश्वर मंदिर (राजराजेश्वर मंदिर) बांधले.
- जमीन सर्वेक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या.
- चीनशी व्यापारी संबंध वाढवले.
5. राजेंद्र पहिला (1014-1044 इ.स)
चोल साम्राज्याचा सर्वात मोठा विस्तार
- श्रीलंकेचा राजा महेंद्र पंचम याला कैद करून संपूर्ण श्रीलंका आपल्या राज्यात विलीन केला.
- बंगालवर हल्ला करून "गंगाईकोंडा चोल" ही पदवी धारण केली.
- श्रीविजय साम्राज्य (सुमात्रा, मलय द्वीपकल्प, जावा) जिंकले.
- चोलागंगम तलाव बांधला.
- वैदिक शिक्षणाचा विकास.
6. राजाधिराज पहिला (1044-1054 इ.स)
- चेर, पांड्य आणि श्रीलंकेच्या संयुक्त सैन्याचा पराभव.
- कल्याणी जिंकून "विजय राजेंद्र" पदवी धारण केली.
- अश्वमेध यज्ञ केला.
- कोप्पमच्या युद्धात चालुक्यांशी लढताना मृत्यू.
7. राजेंद्र दुसरा (1054-1063 इ.स)
- कुडल संगमच्या युद्धात चालुक्य सोमेश्वर पहिल्याचा पराभव.
- कोल्हापुरात जयस्तंभ बांधला ("प्रकेशरी" पदवी).
8. वीर राजेंद्र (1063-1067 इ.स.)
- "राजकेशरी" ही पदवी धारण.
- साम्राज्य वाढवण्यासाठी आपल्या मुलीचे लग्न कल्याणीच्या चालुक्य राजवंशाशी लावले.
- याच काळात कल्याणीचा चालुक्य राजा सोमेश्वर याचा चोलांकडून पराभव त्यामुळे त्यानी तुंगभद्रा नदीत आत्महत्या केली.
9. अधिराजेंद्र (1067-1070 इ.स.)
- विजयालयाने स्थापन केलेल्या चोल साम्राज्याचा अधिराजेंद्र हा शेवटचा शासक.
- एका जनउत्क्रांतीत त्यांची हत्या.
10. चोल-चालुक्य राजवंश (कुलोत्तुंग पहिला – 1070-1120 इ.स.)
- कलचुरी आणि कलिंगवर विजय.
- श्रीलंकेचा राजा विजयबाहूने स्वातंत्र्य घोषित केले.
- जमीन सर्वेक्षण पुन्हा सुरू केले.
- व्यापार सुलभ करण्यासाठी सीमाशुल्क आणि जकात शुल्क रद्द ("शुंगमतविर्त" पदवी).
11. विक्रम चोल (1120-1133 इ.स.)
- चिदंबरम येथील नटराज मंदिराचा जीर्णोद्धार.
- लोकांकडून जबरदस्तीने कर वसूल केला.
- मंदिरात स्थापित प्राचीन वैष्णव मूर्ती समुद्रात फेकून दिली ("त्याग समुद्र" पदवी)
12. कुलोत्तुंग दुसरा (1133–1150 इ.स.)
- गोविंदराजची मूर्ती समुद्रात फेकून दिली.
- ओट्टाक्कुट्टन, सेक्किलर आणि कंबन यांना संरक्षण दिले.
राजराजा दुसरा (1150-1173 इ.स.)
(एक कमकुवत आणि अक्षम शासक)
राजाधिराजा दुसरा (1173-1182 इ.स.)
(त्यांच्या कारकिर्दीत, पांड्य राजघराण्यात उत्तराधिकारावरून वाद झाला, ज्यामध्ये राजाधिराजा दुसरा याने वीर पांड्याला पाठिंबा दिला.)
13. कुलोत्तुंग तिसरा (1182-1216 इ.स.) – शेवटचा महान चोल शासक
- पांड्यांचा पराभव करून चोल सत्ता पुनर्स्थापित केली.
- परंतु 1205 मध्ये पांड्यांकडून पराभव.
**चोल साम्राज्याचा पतन (1216-1279 इ.स.)**
- राजाधिराज तिसरा (कमकुवत शासक) पांड्यांकडून कैद.
- राजेंद्र तिसरा (1250-1279) हा शेवटचा चोल शासक.
- पांड्यांनी अंतिम विजय मिळवून चोल साम्राज्य संपुष्टात आणले.
चोल साम्राज्याचे योगदान
✅ भव्य मंदिरे (वृहदेश्वर, चिदंबरम).
✅ नौदल शक्ती आणि व्यापारी विस्तार.
✅ स्थानिक स्वराज्य संस्था.
✅ कला, साहित्य आणि वास्तुकलेत प्रगती.
0 टिप्पण्या